Sunday, February 23, 2014

हीरा

हीरा

highway चित्रपटात एक खूप सुंदर कबिरांचा दोहा  वापरलाय… प्रचंड philosophy अगदी थोडक्यात सांगणारा दोहा आहे हा !
पहिली चारोळी सांगते कि हिरा खूप ठोकून ठोकून बनवला जातो  , हि गोष्ट आपण समजून घ्यायला हवी … त्या हिऱ्याचा आदर करायला हवा … तसच  एखादा माणूस आपल्या समोर जेव्हा येतो , तो तसा बनण्यासाठी त्याने कष्ट घेतलेले असतात , आपण त्याचा आदर करायला हवा … दुसर्या दोन ओळींमध्ये अस लिहिल आहे कि कितीही पारखून पहिला तरी हिरा तो हिराच ! खोटेपणा कधीतरी बाहेर येतोच पण ज्या हिर्याने इतका त्रास सोसून आकार घेतला त्यात खोत नाही काढता येत


दुसरी चारोळी :
आपला हिरा भाजीच्या बाजारात मांडून ठेवू नये , भाजीच्या बाजारात असताना तो आपल्या जवळ जपून ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे … किती मस्त अर्थ आहे याला ! आपला शहाणपणा कदर नसलेल्या ठिकाणी स्वतःजवळ ठेवावा आणि आपल्या मार्गावर चालत राहावे , कधी न कधी तरी त्या हिर्याला पारखी भेटणारच !

तिसरी चारोळी :
अशाच एका बाजारात एक हिरा रस्त्यावर पडलेला असतो , अनेक लोक त्या रस्त्यावरून ये - जा करतात पण त्यांच्या लक्षात येत नाही तो हिरा , फक्त ज्याला पारख आहे असाच मनुष्य तो हिरा उचलून घेतो !

त्यामुळे आपल्या कडे कुणी लक्ष देत नसल्याचे दुःख करत बसण्यापेक्षा आपल्या कडे योग्य व्यक्तीने  लक्ष देण्याचा  आनंद मोठा नाही का ?

Sunday, February 16, 2014

पहिला उरला नाहीस तू ….

पहिला उरला नाहीस तू …. 

खूप दिवसांनी १०फ मधली हि कविता ऐकली! खरच ध्येयवेड्या माणसाला अस बघायची सवयच आहे आपल्याला… असाच दोन मित्रांची मनोगते , एक ध्येयवेडा आणि दुसरा त्याचा मित्र… दोघांनाही एकमेकांची साथ द्यायची आहे, पण मनात गोंधळ सुरु आहे, कुणी कुणाला बोलून दाखवत नाहीये … हे त्यांच्या मनातले गोंधळ 

----
 

तुझ्या ध्येयामागे तू एवढा वेद झालायस कि आधीसारखा राहिलाच नाहीस तू … तू आधीचा …. खरच आधीच्या "तू" मध्ये अस काय होतं जे आताच्या तुझ्यात नाही ? निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला तू …. स्वप्नांकडे जाताना नक्की कुठे चाललायस तू ?


खर तर जेव्हा मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करतोय तेंव्हाच स्वतःला शोधतोय…. आधीचा मी आणि आत्ताचा मी … कोण आहे मी … अशावेळी मला सर्वात जास्त गरज आहे ती माझ्या माणसांची , मित्रांची , घराची , कुटुंबियांची … स्वतःला शोधताना जगापासून लांब जावच लागतं का ?
हे स्वतःला शोधण म्हणजे नक्की तरी काय ? स्वतःला नवीन नजरेने पाहणं कि जगाला ?



भरारी घेताना दिसत असत उत्तुंग आकाश पण जमिनीवरची नजर कधी हटत नाही ! जर एखादा अशी उंच भरारी घेत  असेल तर आपण त्याला साथ द्यायची , सांभाळून घ्यायचा  का ध्येयासक्ति पासून प्रवृत्त करायच? 



या नवीन "तू " ला समजून घेण्यासाठी , त्याच्या ध्येयांना, स्वप्नांना समजून घ्याव लागेल… त्याच्या स्वप्नांना त्याच्या नजरेने पहाव लागेल !

--

कधी आपण "तू" असतो तर कधी "तू" चा मित्र ! 

Sunday, February 9, 2014

पुन्हा एकदा..White Rock Lake..

आजचा white rock lake खूप खूप वेगळा आहे नेहमी पेक्षा … सूर्यास्त झालाय आधीच आणि खूप खूप थंडी आहे त्यामुळे आसपास चिटपाखरू सुद्धा नाहीये…कडाक्याची थंडी , बेभान सुटलेला वारा , त्यामुळे निर्माण झालेल्या त्या पाण्याच्या लाटा , हातात कॉफी चा कप आणि मी !

आवाज नाही कुठलाच , फक्त वार्याचा झंझावात , गाड्यांचा आवाज नाही , माणसांचा गोंधळ नाही , काही काही  नाही….अगदी सामसूम सगळीकडे …पाण्याच्या लाटांचा तो अगदी हळू आवाज … एवढ्या थंडीत पक्षी सुद्धा नाहीयेत आसपास, बदकं  सुद्धा दिसेनात पाण्यात …

खर तर मी प्रचंड कुडकुडतीये इथे , लिहिताना अगदी हात थरथरतायत ! पण तरीही बसावसं वाटतंय इथे , हि शांतता आवडतीये … हा बोचरा वारा अनुभवायचा आहे … काय माहित पुन्हा असा योग कधी येईल ?

एवढा वाहणारा वर असून सुद्धा एक स्तब्धता आहे वातावरणात , ती आवडतीये मला मनापासून ! खर तर अजून पुढे जाउन पाण्याच्या अगदी जवळ बसायच आहे…

खर तर सगळ गोठलाय माझ , विचार सुद्धा बहुतेक ,त्यामुळे फार काही सुचतच नाहीये…

माझ आणि या जागेच अस एक वेगळा नात आहे, इथून दिसणार आकाश मला स्वतःचं वाटतं ! इथली झाडं मला माझी वाटतात… इथे आल्यावर एक छान "familiar" feeling येतं ! आणि मग एकदम "philosophical" type वाटायला लागतं ! मजेशीर असतो  आपण अगदी ! शांत जागा , निसर्ग वगैरे दिसला कि अचानक आयुष्याबद्दल विचार सुरु !! :) :) :) अचानक आयुष्यातले प्रश्न, त्यांची उत्तरं , अनुभव, आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी वगैरे वगैरे ! अस करायला हव मी , तस व्हायला हव वगैरे वगैरे , सगळ तत्वज्ञान कस घडाघडा आठवायला लागत !! एकदम स्फुरण चढत , आपण म्हणजे एकदम भारी वगैरे वगैरे वाटण्याचे chances वाढायला लागतात !

बापरे , माझ्या बाबतीत अस होण्याच्या आधी इथून उठलेल बरं ! कारण हे सगळ वाटणं ठीक आहे , पण एकदा इथून उठल्यावर त्याचा संपूर्णपणे विसर पडणार असतो ! घरी जाउन पुन्हा आपल नेहमीच सुरु!!








Sunday, February 2, 2014

Catching Fire!

Hunger Games! खरच एक विलक्षण गोष्ट आहे ही !
अजून मी पुस्तक वाचल नाहीये एकही , पण गोष्ट सुंदर आहे…चित्रपट कसे आहेत , याबद्दल इथे चर्चा करायचा अजिबात मानस नाही माझा !

(And knowing the films I watch, I don't think my little "Film Critique" will be valued!)

It is an extra ordinary story of possibilities, imagining the future, human tendencies to react towards fear..The attitude towards systems.. The story captures the human element of all of this very very well.. It is the story of Katnis Everdeen ,the girl on fire.. A story of ordinary girl with extra ordinary will power to survive! Here love for her sister..The moment she participates in the "Hunger Games" , her life changes..and so does everyone elses..People start to think, people start to imagine the possibilities , they start imagining the concept of "FREEDOM", The concept almost unheard of in all the districts.. The hidden fighter starts to find his way out after been entrapped in people for ages..

Amazing storyline and I am sure the books are also a great piece of work.. Planning on reading the books sometime..For now, Cant wait for the next movie!